Sunday, April 17, 2011

मन चालत-चालत





आता लिहून-लिहून काय लिहायचं.... असं जेव्हा वाटतं... तेव्हा काहीतरी लिहूचयात असं ठरवून वगैरे लिहायचं म्हणजे बऱ्याच आठ्वणी येणार, त्यांना सावरावं-आवरावं लागणार, घरकोंबड्या- पणातून बाहेर यावं लागणार, सुट्टीच्या दिवशी अंथरूणातून लवकर उठावं लागणार,हवी ती माणसं नको त्यावेळी आठवावी लागणार आणि नको ती माणसं ...जाऊ दे ना...
       नमनाला घडाभर तेलात उरकतोय कि काय हा! वाटत असेलच!
            पण सध्या मलाही कुठला विषय घ्यावा हा प्रश्न पडला असेल तरी तो ब्रह्मप्रश्न नाहीय यातच नवीन विषय मिळेल लिहायला याचं मूळ सापडतंय. 
कॉलेजमुळे आलेलं मळभ घालवण्यासाठी तुम्ही लोक काय करता? भलतंच काय विचारतोय? माझं म्हणाल तर पोस्टग्रॅज्युएशन करत असूनसुद्धा पकल्यासारखं वाटू लागतं. बरं औरंगाबादमध्ये या ऊन्हाळयात कुठं फिरायला जावं तर तेही करता येईना, म्हणून विचारतोय…! भारत-ऑस्ट्रेलिया मॅच चालू आहे.
आभाळात नेहमीसारखेच पक्षी परतण्याची वेळ होऊन गेली आहे. मैदानावरून सुर्यास्त अप्रतिम दिसतो. आधीपासून असलेली आणि लावलेलीही झाडं रवंथ करणाऱ्या जनांवरांसारखी शांतपणे उभी आहेत. कँटीनवर आज तशी तुरळक गर्दी आहे. भर ऊन्हानंतर सुटणाऱ्या सायंवाऱ्याची सोबत आणि सोबत लतादीदी गातायत. मध्येच मला "घनतमी..." ऐकण्याची लहर येते. भारत-ऑस्ट्रेलिया मॅच पुढे सरकते आहे. 
 हॉस्टेलमध्ये टिव्हीसमोर पूर्वी रामायण बघायला गर्दी व्हायची तसं इथं वातावरण आहे. आज नाथषष्ठीची सुट्टी दिलेली होती. माझ्या भोवती भाराभर असाईनमेंटसचा पसारा पडला आहे.माझ्या रुमच्या खिडकीतून दिसणारी उत्तरसांज किंवा ऊशीरसांज कॅनव्हासवर चितारलेल्या निसर्गचित्रासारखी दिसते, हे तुम्हाला माहीत आहेच.गेटकिपर पेंगळून थकून बसला आहे. माझी कल्पना तो सिगारेट  कां पीत नाही, तंबाखू खाताना तो दिसत नाही... वाटेत मुलींचं हॉस्टेल लागतं.परत भरपूर झाडं...गुलमोहर, शेवरी, सुबाभूळ... कट्ट्यावर एक जोडपं  बसलंय. ती त्याला विचारत असेल ,'वर्ष संपत आलं.. मग फायनल एक्झाम.' त्यातला अर्थ त्याच्या उशीरा लक्ष्यात आला असेल कां? तो फक्त 'हं' एवढंच बोलेल. अंधार वेगाने सांडू लागतो. माझी आणखी एक फेरी पूर्णहोत येते. मध्येच ढग गरजतात. त्यांनाही कशाचीतरी गरज आहेच.वर्कशॉपमधून आणखी वेगाने वेल्डिंगचे आवाज येऊ लागतात. मी दूर जाता जाता ते कमी-कमी होत जातात. आयुष्यातल्या दुःखांनासुद्धा डॉपलर इफेक्ट लागू होतो. काश त्याच्या आपल्यातलं अंतर मोजता आलं असतं. टाळून गेलो असतो.
रस्त्यावर गर्दी वाढल्यासारखी वाटते. रोज लाखो लग्नं होत असतील भारतात.जपानमध्ये आत्ता काय चालू असेल बरं? नवीन काही बातमी. बघायला पाहीजे. चार दिवस झाले निवांतपणे पेपर असा वाचलेला नाहीए.मुली एवढ्या टाईट जिन्स घालू कशा शकतात किंवा कां घालतात? असा मनात खेडूत प्रश्न अनाहूत येतो.
इस्त्रीवाला नमस्कार साहेब म्हणतो.अजाणची बांग ऐकू येते. बुद्धविहारातून  मंत्रघोष आणि शीवमंदीरात नागाची स्तुती... माणसांच्या कोलाहलातून माझे आवाज स्पष्टऐकू येऊ लागतात. देव नावाच्या अस्थित्वावर माझा आणि इतरांचा आत्मा स्थैर्य असतो.देव नसता तरी तो स्थिरच असता पण मग इतरांबद्दल  खात्रीने सांगता आलं नसतं.भारत-ऑस्ट्रेलिया मॅच चालू आहे.
अनेक चित्कार येतात. दिवसातून आज किती आवाज  आले असतील. किती बाहेर पडले असतील.किती आत दबले असतील. रतन टाटांचं वाक्य ," The most  Noise usually comes from people who have the most to hide" मी दचकतो मग हसतो.हसतो म्हणजे सुखात आहे 'दाखवण्यासाठीच'.कुरुप असली तरी माझी दाखवण्याची आणि खाण्याची बत्तीशी एकच आहे.त्यातल्या त्यात बरे आहे. लोकांशी बोलायचा म्हणुनच मी प्रयत्न करीत नाही.कारण ते फक्त दुःखालाच शोधू लागतात. पण ऐकू नाही शकत. त्यांना आनंद हवा असतो.
कारण आजवरच्या सगळ्या ओव्या, ग्रंथ हे दःखावरच वसलेले असतात.त्या वाचून त्यांना कंटाळा येतो. ते एखाद्या चार्ली चॅप्लीनची वाट बघू लागतात. जणू कृष्णजन्मासारखी. हे मध्येच काय आलं. मी डावीकडे एक वळण घेतो.दोन्ही उंच इमारती अंगावर येतात.
मन मोकळं केल्याशिवाय एकाग्रता कशी लाभणार! हे शाओलीनचं तत्त्वज्ञान. आपलं मोकळंमन आपणच भरत राहतो.ते जास्तीत जास्त मधाचं मोहोळ बनवण्याचा प्रयत्न करावा. शेवटी मोकळं करण्याची वेळ येताच मधच बाहेर येईल.आणि कुणी दुसऱ्याने केला तरी.भारत-ऑस्ट्रेलिया मॅच संपत आली आहे. भारताने मॅच जिंकलीसुद्धा.कि ऑस्ट्रेलिया हरली असं म्हणू.काहीही म्हणा पण भारताला 'सरप्राईजेस' देण्याचीसवय आहे. नाही कां?... After all India is a Funny Country! या विचारांना लगाम नसतो आणि विचार घोडे नसतात. त्यांच्यालहरींइतकाच मीही लहरी बनतो. उद्या लवकर उठावं लागणार. वर्क प्रेझेंटेशची तयारी बाकी आहे.बहूत काय?
                   

Tuesday, April 5, 2011

तेच पण वेगळं...

         
    
    नेहमीप्रमाणे सगळीकडची दिनचर्या सुरू झाली होत. मी नित्यकर्मे आटोपून गच्चीत गेलो आणि आज काही खास दिवस असल्याचे सतत वाटू लागलं.
           सगळंच जिथल्या तिथे आहे. रोजच्या मार्गवरून नेमून दिल्यासारखा मार्गक्रमणा करणारा सूर्य, आजुबाजूच्या इमारती, त्यावर तशीच थोडी सावली थोडी किरणे पडली आहेत.मग?रोजच्यासारखी खायला ठेवायला आलोय  असे वाटून चिमण्या, बुलबुल दुकान कधी उघडतो अशा अवस्थेत ग्राहक जसे बसतात तशा फांद्या फांद्यावर आल्या आहेत.इकडून-तिकडून भांड्यांचे, आंघोळीचे आवाज येतायत.सगळ्यांची लगबग चालू आहे
           गाड्यांचे खटारे पळतायत. दूरवरच्या रेल्वे ट्रॅकपाशी खंड्याचा ठणठणपाळ पण सुरेखसूरात ऐकू येतोय. उन्हं वर चढतात. थोड्या वेळात सारं मध्यावर येईल. मग आज वेगळं काय वाटतं?
            ....आणि संकटाच्या दरीतून कुणी वरती यावा, कुंद नभातून सूर्य वा इंद्र्धनुष्यडोकवावा, मोर फर्रऽदिशी पिसारा फूलवून म्यॉऽ करावा, हवीहवीशी वाटणारी मुलगी अचानकसमोर यावी किंवा तोच तिच्या घरी दाखल व्हावा. तसं होताना जे वाटतं त्याचसाधर्म्याने उत्तर मिळालं. कदाचीत आज माझ्याच बघण्याची द्दृष्टी बदलली होती की काय?!

-रोहन