Wednesday, August 10, 2011

नेमकं काय?

सुप्रभात की...
बऱ्याच दिवसांनी ब्लॉगवर लिहायला घेतोय. बरय प्रत्येकवेळी ब्लॉगची पाटी कोरी असते... तिला वेगळ्या भिजवलेल्या बोळ्याची गरज लागत नाही! हं... भिजवलेला बोळ्याची आठ्वण काढताच मन शाळेच्या दिवसात गेलं ना?? पाटी, तिच्यावरचा गृहपाठ पुसला जाउ नये, म्हणून केलेला आटापिटा, पेन्सिल, मधूनच कुरतडून खाता ती चव हवीशी वाटणं, बरच काही...एनीवे...
पुन्हा काय टाकायचं... या विचारात आम्ही पडलो आणि वाटलं.....

‌सांगतो..!

तेच सांगतो...

वाटलं देवा... देवा जग तू कां निर्माण केलस...? बर तयार वगैरे केलस आणि असं का बनवलस?
 बर असं म्हणजे अस्थिर, दंगे-धोपे माजवणारं, भ्रष्टाचारी कां बनवलंस?
देवा तू बनवलंस! देवा तू का बनवलंस,आम्हाला?... देवा आम्ही का बनवलं तुला?!(हे वाक्य दोन ते तीन अर्थांनी, वेगवेगळ्या लोकांकरीता.. ‍ ज्याला जे हवं ते घ्यावं)...तर हे...
अमेरीका मंद झाली न झाली तो इंग्लंड पेटला, तेवढ्यात लोकपाल लीला चालू झाल्या, इतक्यात पवनेचं पाणी पेटलं, त्याआधी इजिप्तचा इश्शू... मग चीनचा...
गरज कुणाची कुणाला? माणसांवरच माणूस जगतो. अवलंबून असतो. राहतो... तरी या अजब प्रकारांनी मी त्रस्त होतो. अरे हे चाललंय काय? डोळेझाक करायची?? मग... प्रतिक्रिया कट्ट्यावर, वाचकांच्या पत्रव्यवहारात द्यायच्या?... फक्त..!?..
काल रात्री अब्राहम लिंकनचं मुलाला लिहिलेलं पत्र सारखं वाचून काढलं.अस्वस्थ झालो की दुसरा पर्याय नसतो तेवढ्या पत्राशिवाय...
असो की! या लिहिण्यामुळं थोडं मन हलकं होईल असं वाटतं आणि कळत-नकळत, वा जाणून-बुजून ते रिकामं करतो असच काही पुन्हा नव्याने भरण्यासाठी...

अखेर इतिहास स्वतःच घडत असतो‌.आपल्यासोबत आपणच... तो पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीने घडतो. नाविन्य इतकच की त्याचा चेहरा वेगळा असतो आणिक मोहरा बदललाय असं फक्त वाटत राहतं...
या साऱ्यांचा विचार अतिंद्रिय वगैरे वाटू लागला की एकच करावं... एक पाटी मार्केटमधून घ्यावी. पेन्सिल घ्यावी आणि बालपण आठवण्यापेक्षाही बाराखडी परत पुन्हा लिहू लागावं...

क्रमशः